मुंबई : मुंब्रा येथे झालेल्या फास्ट लोकल दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताला प्रवासी जबाबदार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले होते, यावर अजित पवार यांच्याकडून प्रतिक्रिया आली आहे. मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेला रेल्वे विभाग जबाबदार आहे, याला कुणीही नाकारू शकत नाही, असे अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंब्रा येथे घडलेल्या रेल्वे अपघाताबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. या अपघाताची जबाबदारी रेल्वे विभागाची असल्याचे स्पष्ट केले आहे. या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे, हे कोणी नाकारू शकत नाही, असे पवार यांनी ठामपणे सांगितले. या प्रकरणी चौकशीचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पवार यांनी मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेच्या सद्यस्थितीवरही भाष्य केले. दोन-तीन मिनिटांनी लोकल ट्रेन सुटते. डबे वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोच्या गतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. काही ठिकाणी बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या दुर्घटनेबाबत चौकशी सुरू असून, त्यातून समोर येणा-या प्रत्येक बाबीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पवार यांनी आश्वासन दिले. चौकशीत जे समोर येईल, त्यानुसार सर्व आवश्यक पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मध्य रेल्वे मुंब्रा जवळ आज सकाळी दुर्घटना घडली. दोन लोकल एकमेकांच्या जवळ जाताना लोक मोठ्या प्रमाणात लटकलेली असतात, लोकांना वेळ महत्त्वाचा असतो, लटकलेले प्रवासी घासले गेले ट्रॅकवर पडले. यात सहा आकडा आला आहे. मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात लोकल यंत्रणा आहे,मोठ्या प्रमाणात गर्दी असते, अनेक जुने ब्रीज काढून नवीन ब्रीज काम केले . अशा घटना घडल्यानंतर ऑडिट करून घेण्याची मागणी समोर येते. केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णवी साहेबांची संपर्क साधणार आहे,काय करावे लागेल याच पहावे लागणार आहे. लोकल दरवाजे केले तर कसे होणार तुम्हाला माहिती आहे, असेही अजि पवार म्हणाले.