22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमुख्य बातम्यामोदींना आम्ही मानसिकदृष्ट्या संपविले : राहुल गांधी

मोदींना आम्ही मानसिकदृष्ट्या संपविले : राहुल गांधी

जम्मू : वृत्तसंस्था
‘आम्ही मोदींना मानसिकदृष्ट्या संपविले आहे,’ असा प्रहार काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्­वास पूर्णपणे ढळला असून, त्यांचे सरकार सत्तेवरून हटविण्याची वेळ आली आहे,’ असे ते म्हणाले.

जम्मू-काश्­मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा श्रीगणेशा राहुल गांधी यांनी केला. बनिहाल विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार विकार रसूल वणी यांच्या प्रचारार्थ संगलदन येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. त्यांचा आत्मविश्वास ढळला आहे, हे मला दिसले आहे. मोदी आणि भाजपला सत्तेवरून हटविण्याची वेळ जवळ आली आहे. पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले तेव्हाच त्यांचा आत्मविश्वास कमी झाला.

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि त्यांछा उद्योजक मित्र केंद्रात सरकार चालवित आहेत, असा दावाही त्यांनी केला. ‘जीएसटी’ आणि नोटाबंदीमुळे छोट्या उद्योगांना फटका बसला आहे. हे सरकार केवळ दोन अब्जाधीशांसाठीच काम करीत आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी मोदींवर बेरोजगारीवरुन टीका केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR