28.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeअंतरराष्ट्रीयरशियन सैन्यातील १६ भारतीय जवान बेपत्ता

रशियन सैन्यातील १६ भारतीय जवान बेपत्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रशिया-युक्रेन युद्धाला सुरू होऊन बराच काळ लोटला आहे. या युद्धात दोन्ही बाजुच्या हजारो सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे, या युद्धात काही भारतीयांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जातो. आता केंद्र सरकारने याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. रशियन सशस्त्र दलात अजूनही १८ भारतीय आहेत, त्यापैकी १६ बेपत्ता असल्याची माहिती रशियाने दिली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सरकारला रशियन सैन्यात सेवा करणा-या एकूण भारतीयांची माहिती आहे का आणि असल्यास, त्यांचे तपशील आहेत का? असे विचारण्यात आले होते. परराष्ट्र मंत्रालयाला असेही विचारण्यात आले होते की, ज्या भारतीय नागरिकांची सुटका केली आहे, त्यांना भारतात कधी आणले जाणार आहे? यावर कीर्तीवर्धन सिंह म्हणाले, उपलब्ध माहितीनुसार, रशियन सशस्त्र दलात १२७ भारतीय नागरिक होते, त्यापैकी ९७ च्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
या विषयावर भारत आणि रशियन सरकारमधील उच्च पातळीवरील सतत संपर्काचा परिणाम म्हणून, सरकारला रशियामध्ये अजूनही अडकलेल्या आणि त्यांच्या सैन्यात सेवा देत असलेल्या भारतीय तरुणांच्या संख्येचा तपशील देण्यास सांगण्यात आले होते. ‘एमआयए’ने रशियामध्ये पाऊले उचलली आहेत आणि भारतीय दूतावासाने त्यांना परत पाठवले आहे. १८ भारतीय नागरिक अजूनही रशियन सशस्त्र दलात आहेत, त्यापैकी १६ रशियाने बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. सरकारने अशा व्यक्तींबद्दल संबंधित रशियन अधिका-यांना माहिती दिली जाईल असे सांगितले, अशी माहिती त्यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR