रेल्वे बायपासला शेतक-यांचा तीव्र विरोध; भूसंपादन व मोजणी प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

पूर्णा : पूर्णा जंक्शन येथील प्रस्तावित ३.२२ किलोमीटर रेल्वे बायपास लाईनच्या भूसंपादन व मोजणी प्रक्रियेला बाधित शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर गोर, आडगाव (लासिना) आणि बरबडी परिसरातील बाधित शेतक-यांनी दि. २१ ऑगस्ट रोजी प्रशासनाकडे हरकत व विरोधाचे निवेदन सादर केले. भूसंपादन प्रक्रिया तात्काळ रद्द करून भूसंपादन व मोजणीची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतक-यांनी दिला आहे
.
प्रस्तावित रेल्वे बायपाससाठी शेतजमिनींचे भूसंपादन आणि मोजणी प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालींमुळे परिसरातील शेतक-यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रकल्पामुळे सुपीक व बागायती जमिनी बाधित होणार आहेत. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या शेतीवर अवलंबून असल्याचे शेतक-यांनी निवेदनात नमूद केले आहे. जमीन संपादित झाल्यास कुटुंबांचे पालन पोषण, मुलांचे शिक्षण, औषधोपचार तसेच दैनंदिन गरजा भागविण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. जमिन मोजणी व हस्तांतरणासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. प्रस्तावित बायपाससाठी जमीन संपादन करण्यापूर्वी बाधित शेतकरी व ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी भुमिका शेतक-यांनी घेतली आहे.

या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, सक्षम प्राधिकारी (रेल्वे भूसंपादन), उपमुख्य अभियंता (गती शक्ती), दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभाग, जिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) परभणी यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. यावेळी गोर, आडगाव (लासिना) व बरबडी येथील बाधित शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नांदवे यांचीही उपस्थिती होती. एक गुंठाही जमीन रेल्वेला देणार नाही,अशी ठाम भूमिका शेतक-यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रस्तावित रेल्वे बायपासच्या भूसंपादन प्रक्रियेवरून येत्या काळात तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41
Video thumbnail
DEVANI|संघर्ष,जिद्द आणि लोकविश्वासाचा चेहरा;रामलिंग शेरे
03:25
Video thumbnail
DEVANI|16 वर्षांची आरोग्यसेवा,करुणा कर्तव्याचा आदर्श प्रवास- डॉ संतोष बिरादार
02:29

Latest news