नगर : प्रतिनिधी
सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाचा वापर करुन घेणं चुकीचे असल्याचे मत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केले धर्म, जात आणि पैसा या तीन गोष्टी अतिशय ताकतीने या निवडणुकीत वापर झाला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एखाद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखे पैसे वाटप करुन मतदान घेण्याचा प्रकार झाला, हे लोकशाहीसाठी घातक ठरणार असल्याचे कडू यावेळी म्हणाले.
लोकशाहीमध्ये लोकांचा विश्वास कायम राहण्यासाठी निवडणुका असतात. त्या निवडणुकांमध्ये स्पष्ट आणि निस्वार्थ निष्पक्षपणे निवडणुका झाल्या पाहिजेत, असे मत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. निवडणुका जर निस्वार्थी होताना दिसत नसतील तर लोक निवडणुका हातात घेतात. कुठलाही सत्ताधारी असू दे मग ते भाजपवालेकिंवा काँग्रेसवाले असेही बच्चू कडू म्हणाले.