23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारच्या उदासीनतेमुळे राज्यात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातकडे

सरकारच्या उदासीनतेमुळे राज्यात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातकडे

मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये गेला, अशी टीका करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस विरुद्ध महायुती असा राजकीय वाद राज्यात पाहायला मिळत आहे. आता महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे गेला. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पाअंतर्गत १८ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे. आधी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प हे सगळे गुजरातच्या झोळीत पडले आहेत, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत १८ हजार कोटींची गुंतवणूक होणार होती.
ते पुढे म्हणाले की, हिंदू-मुस्लिम, जीभ कापा-जिभेला चटके द्या, पक्ष फोडा-आमदार पळवा, सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे अधिकारी हे मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहेत. असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पीछेहाट होत असून राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत, असा आरोप त्यांनी महायुती सरकारवर केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR