26.3 C
Latur
Sunday, May 25, 2025
HomeUncategorizedहिंदू समाज मजबूत होईल, तेव्हाच भारतालाही वैभव! सरसंघचालक भागवत यांची भूमिका

हिंदू समाज मजबूत होईल, तेव्हाच भारतालाही वैभव! सरसंघचालक भागवत यांची भूमिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदू समाजाच्या एकतेवर भर दिला आणि म्हटले आहे की, भारताची एकता ही हिंदूंच्या सुरक्षिततेची हमी आहे. हिंदू समाज आणि भारत एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत. जेव्हा हिंदू समाज मजबूत होईल, तेव्हाच भारतालाही वैभव मिळेल.

‘आरएसएस’च्या मुखपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत भागवत यांनी शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचार आणि मानवाधिकार संघटनांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, जोपर्यंत हिंदू समाज स्वत: मजबूत होत नाही, तोपर्यंत जगात कोणीही त्यांची काळजी करणार नाही. संघ जगभरातील हिंदूंसाठी शक्य ते सर्व करेल. संघाचे स्वयंसेवक धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करताना हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची शपथ घेतात.

भागवत पुढे म्हणाले, बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध यावेळी जो संताप व्यक्त झाला आहे, तो यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता. आता तिथले हिंदू म्हणत आहेत- आम्ही पळून जाणार नाही, आम्ही आमच्या हक्कांसाठी लढू. हिंदू समाजाची अंतर्गत ताकद वाढत आहे आणि संघटनेच्या विस्तारामुळे ही ताकद आणखी व्यापक होईल. हे ध्येय पूर्णपणे साध्य होईपर्यंत आपल्याला लढा सुरू ठेवावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR