ठाणे : शहापूरमध्ये आश्रम शाळेत मुलींना विषबाधा झाल्याची घटना घडली. जेवणातून ही विषबाधा झाली, यामुळे ६५ मुली अत्यवस्थ आहेत. गुलाबजामधून मुलींना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मुलींवर उपचार सुरु आहेत.
आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत ही शाळा चालवण्यात येते. मुलींच्या पोटामध्ये अचानक त्रास झाल्यामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर या मुलींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत.