28.4 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeराष्ट्रीयकारच्या भीषण अपघातात ८ ठार

कारच्या भीषण अपघातात ८ ठार

जयपूरहून महाकुंभाला जात होती कार टायर फुटल्याने कार बसला धडकली

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये कारने बसला पाठिमागून धडक दिली. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. हे सर्व लोक जयपूरहून प्रयागराजला महाकुंभात स्रान करण्यासाठी जात होते. हा अपघात दुडू परिसरात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कार आणि रोडवेज बसमध्ये भीषण टक्कर झाली. बसचा टायर फुटल्यामुळे कार नियंत्रणाबाहेर गेली आणि दुभाजकाच्या दुस-या बाजूला जाऊन कारला धडकल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात ८ जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतांची ओळख पटवली आणि त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली.

अपघातामुळे रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, जोधपूर रोडवेज डेपोची बस जयपूरहून अजमेरला जात असताना अचानक बसचा टायर फुटला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दुभाजक तोडून अजमेरहून जयपूरला येणा-या इकोला धडकली. यामध्ये कारमध्ये प्रवास करणा-या ८ जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत पुरुष आहेत जे भिलवाडाच्या कोटडी भागातील रहिवासी आहेत. हे लोक प्रयागराजमध्ये महाकुंभ स्रान करण्यासाठी जात होते पण त्यापूर्वीच ते अपघाताचे बळी ठरले. दिनेश रेगर, नारायण, बबलू मेवाडा, किशन, रविकांत, प्रमोद सुथार, बाबू रेगर आणि प्रकाश मेवाडा अशी मृतांची नावे आहेत.

बसमधील प्रवासी मोहन सिंह, माया नायक आणि गुन्नू जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रेनच्या मदतीने पोलिसांनी बस आणि खराब झालेली कार रस्त्यावरून बाजूला केली आणि वाहतूक पुन्हा सुरू केली. अपघात इतका भीषण होता की बसला धडकल्यानंतर कारचे तुकडे झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR