मुंबई : प्रतिनिधी
मंत्री नितेश राणे हे सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, नितेशने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले पाहिजे. सभेत बोलणे सोपे आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमके कोणाचा फायदा करतोय याचे भान असले पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.
दरम्यान, नुकतेच त्यांनी सगळ्यांचा बाप भाजपचा मुख्यमंत्री तिथे बसला आहे, हे लक्षात ठेवावे. तसेच कोणी कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचे मोठे बंधू निलेश राणे यांनी नितेश राणे यांना सल्ला दिला आहे.