30.6 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रसोयाबीनला चांगला दर मिळेना !

सोयाबीनला चांगला दर मिळेना !

शेतक-यांची अपेक्षा फोल

अमरावती : यंदा खरीप हंगामात अनियमित पावसामुळे सोयाबीनच्­या उत्­पादकतेवर परिणाम झाला. उत्­पादन कमी झाल्­याने बाजारात चांगले दर मिळतील, ही शेतक-यांची अपेक्षा फोल ठरली आहे. सोयाबीनची काढणी होऊन दोन महिने झाले, तरी सोयाबीनचे दर पाच हजारांवर गेलेले नाहीत. सध्­या शेतक-यांना सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकावे लागत आहे. सोयाबीन विकावे की प्रतीक्षा करावी या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहेत.

अमरावती कृषी उत्­पन्­न बाजार समितीत किमान ४ हजार ५०० तर कमाल ४ हजार ६७९ म्­हणजे सरासरी ४ हजार ६४१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. अकोला बाजार समितीत सरासरी ४ हजार ६३५ रुपये, तर वाशीम बाजार समितीत सरासरी ४ हजार ५५० रुपये दर मिळाला. सोयाबीनचे हमीभाव ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल इतके आहेत. पश्चिम विदर्भातील अनेक बाजार समित्­यांमध्­ये हमीभावाइतके किंवा त्­यापेक्षा कमी दर मिळत आहेत.

गेल्­या हंगामात सोयाबीनचे हमीभाव ४ हजार ३०० रुपये इतके होते. आंतरराष्­ट्रीय बाजारात खाद्यतेल स्­वस्­त झाल्­याने विक्रमी आयात झाली. स्­वस्­त खाद्यतेल देशात आल्­याने सोयाबीनच्­या दरावर परिणाम झाला. सध्­या कमी भाव मिळत असल्­याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. साधारणत: दिवाळीच्या सुमारास खरीप हंगामातील सोयाबीन शेतक-याच्या घरात यायला सुरुवात झाली. त्या वेळीसुद्धा सोयाबीनचा दर आजच्या दरांएवढाच होता. गरजू शेतक-यांनी मिळेल त्या भावात व्यापा-यांना त्यावेळी सोयाबीन विकून टाकले. पण ब-याच शेतक-यांनी भविष्यात भाववाढ होईल या आशेने सोयाबीन साठवून ठेवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR