30.5 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रमविआत जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत

मविआत जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत

मुंबई : वंचित बहुजन आघाडी ही मविआचा घटक आहे. वंचितसह शिवसेनेचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. त्­यामुळे जागावाटपावरून मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत अशी भूमिका ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्­पष्­ट केली.

तसेच काँग्रेस आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद नाहीत. राहुल गांधी यांच्या यात्रेने उत्­साह निर्माण होईल तसेच त्­यांच्या पक्षाला यामुळे ताकद मिळेल असे ते म्­हणाले. नितीशकुमार यांच्याबाबत बोलताना ते अनुभवी नेते आहेत. त्­यांच्याबाबत सर्वजण सकारात्­मक असल्­याचे ते म्­हणाले.

देशात गेल्­या १० वर्षांत बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. शेतक-यांच्या आत्­महत्­या वाढल्­या आहेत. त्­यामुळे शेतक-यांच्या प्रश्नाबाबत सरकारने स्­पष्­टीकरण द्यावे असे मत ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्­त केले. देशात उद्योगपतींची कर्जे माफ होतात, मग शेतक-यांची कर्जे का माफ होत नाहीत, असा प्रश्नही त्­यांनी यावेळी उपस्­िथत केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR