मुंबई : वंचित बहुजन आघाडी ही मविआचा घटक आहे. वंचितसह शिवसेनेचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे जागावाटपावरून मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत अशी भूमिका ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली.
तसेच काँग्रेस आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद नाहीत. राहुल गांधी यांच्या यात्रेने उत्साह निर्माण होईल तसेच त्यांच्या पक्षाला यामुळे ताकद मिळेल असे ते म्हणाले. नितीशकुमार यांच्याबाबत बोलताना ते अनुभवी नेते आहेत. त्यांच्याबाबत सर्वजण सकारात्मक असल्याचे ते म्हणाले.
देशात गेल्या १० वर्षांत बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे शेतक-यांच्या प्रश्नाबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे असे मत ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. देशात उद्योगपतींची कर्जे माफ होतात, मग शेतक-यांची कर्जे का माफ होत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्िथत केला.