परभणी : ग्रंथराज पुर्णवाद अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित तिनदिवसीय संगीत संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध सतारवादक उस्ताद उस्मानखां यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी आ.राहूल पाटील, संगीतसंमेलनाचे अध्यक्ष एकनाथ उर्फ अनिल मोरे,जीवनकला मंडळाचे अध्यक्ष व्यंकटेश दादा कुरूंदकर, उत्सवमूर्ती सुरमणी डॉ.कमलाकर परळीकर, ओम पुर्णवादी संगीत अकादमीच्या अध्यक्षा डॉ.संगीता पारनेरकर यांची उपस्थिती होती.
उद्घाटकीय भाषणात उस्ताद उस्मानखां म्हणाले की, आज मी कलाकार म्हणून जगभर फिरतो ते शास्त्रीय संगीताच्या बळावर.मी कुणीच नव्हतो आणि नाही देखील मला या सतार ने मोठं केलंय. कलावंताने स्वतःमोठं होतांना कलेलाही मोठं केलं पाहिजे. प.पू.रामचंद्र महाराजांनी पुर्णवादातून मांडलेले तत्वज्ञान जीवन जगण्यासाठी अतिशय श्रेयस्कर व अनुसरणीय असल्याचे आ. राहूल पाटील यांनी सांगीतले. अध्यक्षीय भाषणात एकनाथ मोरे यांनी अतिशय खुमासदारपणे विचार मांडले. मान्यवरांचा सत्कार गुणेशदादा पारनेरकर,श्रीकांत देशपांडे,मोरेश्वर इनामदार,शशी अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ.संगीता पारनेरकर यांनी केले. संगीत संमेलनानिमित्त दै.दीलासाच्या वतीने प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रारंभी विश्राम परळीकर पंचाहत्तर गायकांनी पुर्णवादी गीत सादर केले.त्यानंतर श्रीराम गुरू शैव यांनी वेदपठण केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सीमंतिनी कुंडीकर यांनी केले.
सुरमणी डॉ. कमलाकर परळीकर यांचा जीवन गौरव करताना उस्ताद उस्मानखां यांच्याहस्ते त्यांचा शाल श्रीफळ,पुणेरी पगडी मानपत्र देवून गौरव करण्यात आला.आपण हा सन्मान सद्गुरू चरणी अर्पण करीत असल्याची भावना डॉ.परळीकरांनी व्यक्त केले.आजच्या या सोहळाप्रसंगी प.पू.विष्णूमहाराज उपस्थिती असते तर मला अधिक आनंद झाला असता सांगताना ते सद्गदित झाले होते.