35.5 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeक्रीडाटीम इंडिया चालली झिम्बाब्वे दौ-यावर!

टीम इंडिया चालली झिम्बाब्वे दौ-यावर!

मुंबई : जवळपास आठ वर्षांनंतर टी-२० मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वे दौ-यावर जाणार आहे. टीम इंडिया या जुलैमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामने खेळणार आहे. २०१६ नंतर भारत टी-२० मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

झिम्बाब्वे क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही घोषणा केली. ६ जुलैपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. शेवटचा सामना १४ जुलै रोजी होणार आहे.

झिम्बाब्वे दौ-यात भारतीय संघ आपले सर्व सामने हरारे येथेच खेळणार आहे. १ ते २९ जून दरम्यान होणा-या टी-२० वर्ल्ड कपनंतर ही मालिका आयोजित केली जाईल. झिम्बाब्वे क्रिकेटच्या निवेदनात म्हटले आहे की, या मालिकेचा प्राथमिक उद्देश द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि दोन्ही क्रिकेट मंडळांमधील सहकार्याची भावना वाढवणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR