नागपूर : राजस्थानसह इतर राज्यातील संत्रा बाजारपेठेत दाखल झाला आहे. बांगलादेशाने निर्यातशुल्क वाढवल्याने बाजारात संत्र्याच्या दरात विक्रमी घट झालेली आहे.
मागील वर्षी २० ते ४० रुपये प्रतिकिलो असलेल्या संत्र्यांचे दर १५ ते ३० रुपये किलोवर आले आहेत. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतातील संत्र्यांवर डासांचा प्रादुर्भाव झाल्यानेही संत्र्यांची गुणवत्ताही घसरली आहे.