28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रहापूस करतोय अख्ख्या जगावर राज्य

हापूस करतोय अख्ख्या जगावर राज्य

दररोज ९ हजार पेट्यांची होतेय निर्यात

नवी मुंबई : मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे. यावर्षीही हापूसला विदेशातून मागणी वाढत आहे. आखाती देशांमध्ये प्रतिदिन ८ ते ९ हजार पेट्यांची निर्यात होऊ लागली आहे.
मार्चअखेरीस युरोपलाही आंबा पोहोचणार असून, अमेरिकेसह जवळपास ५० देशांमधील नागरिकांना आंब्याची चव चाखता येणार आहे.
कोकणासह दक्षिणेकडील राज्यांमधून मुंबईत आंब्याची आवक होत आहे. प्रतिदिन २० हजार पेट्यांपेक्षा जास्त आवक होत आहे. यामध्ये कोकणातील हापूसचा सर्वांत मोठा वाटा आहे.

हंगामाच्या सुरुवातीलाच विदेशातूनही मागणी वाढत आहे. सद्य:स्थितीमध्ये आखाती देशामध्ये नियमित निर्यात सुरू आहे.
मुंबईतून रोज ८ ते ९ हजार पेट्यांची निर्यात सुरू आहे. पुढील काही दिवसांमध्ये युरोपीय देश व अमेरिकेमध्येही आंबा निर्यात केला जाणार आहे. निर्यात सुलभ व्हावी यासाठी अनेक व्यापा-यांनी अत्याधुनिक पद्धतीने आंबा पिकविण्याची यंत्रणा उपलब्ध केली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण केंद्र सुरू केले आहे. अमेरिकेला आंबा पाठविण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठीची यंत्रणाही पणन मंडळाच्या केंद्रामध्ये उपलब्ध आहे.

५० देशांमध्ये भारतीय आंबा
मुंबईमधून हवाई व सागरी मार्गाने आंब्याची निर्यात होत आहे. यावर्षीही ४० ते ५० देशांमधील नागरिकांना भारतीय आंब्याची चव घेता येणार आहे. बाजार समिती संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की, निर्यातीला सुरुवात झाली असून, एप्रिल व मेमध्ये निर्यातीचा टक्काही वाढणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR