29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनदारूच्या व्यसनामुळेच पहिले लग्न मोडले

दारूच्या व्यसनामुळेच पहिले लग्न मोडले

मुंबई : जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी लिहिलेली अनेक गाणी आजही लोक गुनगुनत असतात. शबाना आझमीशी लग्न करण्यापूर्वी त्यांनी पटकथा लेखक हनी इराणी यांच्याशी लग्न केले होते, ज्यांच्यापासून त्यांना फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही दोन मुले आहेत. अलीकडेच एका संवादादरम्यान जावेद अख्तर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत स्पष्टच सांगितले की, दारुच्या व्यसनामुळे त्याचे पहिले लग्न मोडले.

या मुलाखतीदरम्यान जावेद अख्तर यांनी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली. आपल्या आयुष्यातील काळ आठवून ते म्हणाले की जर मी संयमी आणि जबाबदार व्यक्ती असतो तर हनी इराणीसोबतचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले नसते.

मी आरोग्याची काळजी न करता दारूच्या आहारी गेलो होतो. मला खात्री आहे की जर मी शांत असतो तर कदाचित सध्याची परिस्थिती वेगळी असती. आपल्या पहिल्या पत्नीबद्दल बोलताना त्यांनी हनीचे कौतुक केले आणि ती एक अद्भुत महिला आहे. मला तिच्याबद्दल खूप आदर आहे आणि म्हणूनच आज आम्ही चांगले मित्र आहोत, असे अख्तर म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR