सोलापूर: सोलापूर शहरातील बंद अवस्थेतील पोलिस चौक्यांची दुर्दशा झाली आहे. या चौक्यांम धून भिकाऱ्यांचे वास्तव्य होत आहे. त्यामुळे या बंद असलेल्या पोलिस चौक्या त्वरीत सुरु कराव्यात, अशी मागणी शिवसेना उबाठा गटाच्यावतीने पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, महानगप्रमुख विष्णु कारमपुरी, परिवहन समितीचे माजी सदस्य शहर उत्तर विधानसभा समन्वयक प्रमुख विजय पुकाळे आदी उपस्थित होते.
शहरातील मुख्य पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पोलीस चौकी बंद ठेवल्याने मोडकळीस आल्या आहेत. काही ठिकाणी कचरा कुंडी, मोकाट जनावरे वावरत आहेत. शहराचे वाढते शहरीकरण, व्यापारी नागरी वसाहती, विविध शासकीय निमशासकीय, कार्यालय शाळा महाविद्यालय, दवाखाने परिसरात पोलीस चौकीमुळे तातडीने संपर्क साधण्यासाठी फायदेशीर असते.
सध्या शहरातील विविध भागात उघडपणे भुरटे चोर, रोडरोमिओंचा वावर, रिकाम्या टेकड्यांची हुल्लडबाजी बेधडकपणे वाहने चालवणे अशा विविध गंभीर घटना करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलीस खात्याची करडी नजर असणे हि नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिने अशा पोलीस चौकीमुळे वचक बसेल.असे निवेदनात म्हटले आहे.