25.6 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeसोलापूरदुष्काळामुळे फळबाग शेतकरी चिंतेत

दुष्काळामुळे फळबाग शेतकरी चिंतेत

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून फळबागांना पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे पुढील काळात फळबाग जगवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात फळबागांसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. जेणेकरून फळबागांचे नुकसान होणार नाही. उन्हाळा सुरू झाला की पाण्याची पातळी कमी होऊन याचा फटका मोठ्या प्रमाणात फळबागांना बसत असतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या फळबागांसाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करायचे यासाठी कृषी विभागाकडून काही उपाययोजना सुचवल्या आहेत.

फळबागामध्ये मुख्यत्वे काही प्रमाणात सीताफळ, डाळिंब, आंबा या पिकांची लागवड आहे. उन्हाळ्यात जर झाडांना पाण्याचा ताण बसला तर पुढे फळधारणेवर आणि एकंदरीत उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे आहे त्या उपलब्ध जलसाठ्यामध्ये फळबागांचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येते. काही शेतकऱ्यांच्या १० ते १४ वर्षांच्या जुन्या फळबागा आहेत. जर पाणी व्यवस्थापन नीट झाले नाही तर या बागा वाळून मागची मेहनत वाया जाऊ शकते.

पाण्याचा वापर कार्यक्षमतेने करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत योग्य आहे. ठिबक सिंचनामुळे ७५ ते ८० टक्के पाण्याची बचत होते. जर बागेतील झाडे छोटी असतील, कमी झाडे असतील तर मटका पद्धतीचाही वापर केला जाऊ शकतो. लहान झाडांसाठी ७ ते ८ तर मोठ्या झाडांसाठी १५ ते २० लीटर क्षमतेचे मडके झाडांच्या बुंध्याजवळ १ फूट अंतरावर गाडगे आणि मडक्याचे तोंड कापडाने बांधून टाकावे. जसजसे पाणी मडक्यातून झिरपेल तसे झाडांची मुळे पाणी शोषून घेतात.

झाडांच्या बुंध्याभोवती जे आळे केले त्या आळ्यावर पाचटाचे आच्छादन करावे. त्याला एकदा अर्ध्या बाजूने तर दुसऱ्या वेळी राहिलेल्या अर्ध्या बाजूने पाणी द्यावे. जेणेकरून पाणी बचत होईल. आणि झाडे वाळणार नाहीत. अशा प्रकारे काळजी घेतल्यास या कडक उन्हाळ्यात देखील फळबागा जगतील, असे आश्वासन कृषी साहाय्यक सोनाली नाईकनवरे यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR