छ. संभाजीनगर : ‘साहित्य भारती’ या साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या संघ परिवारातील संस्थेच्या देवगिरी प्रांत अध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर येथील प्रेरक लेखक दत्ता जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. प्रांत कार्याध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम पाटील (जळगाव), सह कार्याध्यक्ष उमेश काळे (छ. संभाजीनगर) आणि प्रचार प्रमुख विभाकर कुरंभट्टी (जळगाव) हे अन्य नियुक्त पदाधिकारी आहेत.
देवगिरी प्रांतामध्ये मराठवाड्यातील सर्व ८ आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार असे एकूण ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. या संपूर्ण कार्यकारिणीची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय विचार केंद्रस्थानी मानून साहित्य क्षेत्रात सक्रिय असलेल्या लेखक, कवी आणि वाचकांचे व्यासपीठ असलेल्या या संघटनेचा विस्तार देशव्यापी आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद या नावाने १९६२ मध्ये या न्यासाची स्थापना करण्यात आली. या न्यासाद्वारे साहित्य भारती चे संचालन करण्यात येते.