नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मोदी सरकारला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. सहा विद्यमान केंद्रीय मंत्री पिछाडीवर आहेत.
स्मृती इराणी, कौशल किशोर, अजय मिश्रा टेनी, महेंद्र नाथ पांडे, अनुप्रिया पेटल आणि संजीव बालियान हे सहा मंत्री आहेत.
अमेठीतून स्मृती इराणी पिछाडीवर आहेत. सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा ३२ हजार ६ मतांनी आघाडीवर आहेत. त्याचवेळी, बसपाचे नन्हे सिंह चौहान हे किशोरी लाल शर्मा यांच्यापेक्षा १ लाखांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत