22.1 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रआगामी निवडणूक एकत्रित लढविणार

आगामी निवडणूक एकत्रित लढविणार

महाविकास आघाडीने विधानसभेला ठोकला शड्डू

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देताना महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकतीने एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषद बोलताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणूकही पूर्ण ताकदीने लढणार असल्याची घोषणा केली.

दरम्यान, मुंबईतल्या वायबी सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती होती.

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं म्हटलं आहे. जशा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तशाच आणि त्यात ताकदीने आम्ही विधानसभा लढणार आहोत, असं चव्हाण म्हणाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून स्वबळाचा नारा देण्यात येत होता, त्याला त्यालाही पूर्णविराम मिळाला आहे. चव्हाण यांनी सांगितले की, आज तीन पक्षांची प्राथमिक बैठक झाली. ही बैठक विधानसभेची पूर्वतयारीच्या अनुषंगानेच होती. लोकसभेसाठी आम्ही ज्या पद्धतीने लढलो त्यापेक्षा अधिक ताकदीने लोकांचे प्रश्न मांडून विधानसभेमध्ये सुद्धा बदल करू, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी, पृथ्वीराज चव्हाण बोलताना म्हणाले की ही पत्रकार परिषद महाराष्ट्र जनतेचा आभार मानण्यासाठी आहे. लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्रात जनतेने घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळवून दिले. अनेक संघटनांनी छोट्या पक्षांनी वातावरण निर्मितीसाठी मदत केल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष करून नमूद केले. लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने आम्हाला मत दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

प्रचंड धनशक्ती विरोधात ही निवडणूक आम्ही लढवली आणि यश मिळवल्याचं त्यांनी नमूद केले. या निवडणुकीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी सुद्धा एक संदेश दिला आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुद्धा झाला. मात्र, तो यशस्वी झाला नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जवळपास प्रत्येक मतदारसंघांमध्ये प्रचार केल्याचा विशेष उल्लेख पृथ्वीराज चव्हाण यावेळी यांनी बोलताना केला.

नाना पटोलेंच्या अनुपस्थितीती
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजच्या बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार, असं बोलले जात असतानाच बैठकीला उपस्थित असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR