25 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeधाराशिवजळकोटवाडी येथे तरुण शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

जळकोटवाडी येथे तरुण शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

सावरगाव : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी येथील तरुण शेतकरी राम जनार्धन बोबडे (वय ३९) वर्ष यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळुन तसेच शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेला दूध व्यवसाय तोट्यात येत असल्यामुळे नैराश्यातून शेतातील पत्र्याच्या शेडमधे गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी दि. ६ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.

जळकोटवाडी येथील राम बोबडे यांनी कर्ज घेऊन शेतात लाखो रुपये खर्च करून काकडीचे पीक घेतले होते. त्यात काकडीला दर न मिळाल्याने आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. दुग्ध व्यवसायासाठी लागणारा खर्च आणि नफा याचा ताळमेळ न लागल्याने शेती व्यवसायासाठी घेतलेले कर्ज वाढत असल्याने आर्थिक संकटाला कंटाळून त्यांनी स्व:ताच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आडुला गळफास लावुन आत्महत्या केली. मयत शेतकरी राम बोबडे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शेतकरी आत्महत्या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी जाऊन तामलवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार राजेंद्र चौगुले, विक्रम सावंत यांनी घटनास्थळ पंचनामा केला. पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR