24.7 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील मुख्यमंत्री कॉमेडी माणूस : नाना पटोले

राज्यातील मुख्यमंत्री कॉमेडी माणूस : नाना पटोले

मुख्यमंत्र्यांत ‘सिरीअसनेस’ नाही कट करणे त्यांच्यासाठी गौरवाची बाब

मुंबई : मुंबईमध्ये झालेली हिट अँड रनची घटना भयावह अशी घटना आहे. या घटनेमध्ये शिंदे गटाच्या पदाधिका-याच्या मुलाने महिलेला चिरडून टाकले. महाराष्ट्राच्या विकासाची गती थांबवण्यासारखा या घटना आहेत. या सरकारला सत्तेचा माज आल्याची घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हिट अँड रन प्रकरणावरून तसेच राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरून हल्लाबोल केला.

पटोले म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सांगितले होतें आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही. मात्र, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कॉमेडी माणूस असून सिरीयस अजिबात नाही. आपली खुर्ची वाचवणे, भ्रष्टाचार आणि कटकारस्थान निर्माण करणे हे त्यांच्यासाठी गौरव आणि अभिमानाचा असल्याची बोचरी पटोले यांनी केली. ते म्हणाले की समृद्धी महामार्ग भंडारापर्यंत घेऊन जात आहेत. मात्र, त्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे. महागाई निर्माण करण्याचे काम होत असल्याचे ते म्हणाले. चुकीच्या माणसाच्या हातामध्ये सरकार आहे. सरकार जे सांगेल तेच अधिकारी काम करत असल्याचे पटोले म्हणाले. लाडकी बहीण योजनेवरूनही नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडले. लाडकी बहीण योजना वाचवेल असे त्यांना वाटते. मात्र हे मिथक आहे. सर्व भगिनी त्रासल्या आहेत. सरकार गाजर दाखवत असून त्यांना माहीत असल्याचे ते म्हणाले. या योजनेचा कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

कोण सुरक्षीत हा प्रश्न?
नाशिकमधील झालेल्या घटनेवरून सुद्धा पटोले यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की कोणत्या विभागातील अधिकारी सुरक्षित आहे हाच प्रश्न आहे. एक्साईजच्या अधिका-यांना मारले जात आहे, अशा घटना रोजच घडत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. अधिका-यांच्या बदल्या पैसे घेऊन करण्याने याचा परिणाम महाराष्ट्रातील जनतेवर होत आहे अशी टीका त्यांनी केली.

फडणवीस राजा हरिश्चंद्र आहेत
पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खोचक टीका केली. त्यांनी सांगितले की आपल्याबद्दल ते नॅरेटिव्ह तयार स्वत: ते करत असेल तर काय, ज्यांनी खोटे बोलून सत्ता घेतली तो खोटे नॅरेटिव्हबद्दल बोलत असेल तर काय? अशी विचारणा त्यांनी केली. फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी खोटे नॅरेटिव्ह पसरवले. फडणवीसच याचे मास्टरमाईंड आहेत. विधानपरिषद निवडणुकीत चुकीचा नॅरेटिव्ह पसरवले जात आहे, आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR