लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात यावर्षी पावसाचे लवकर आगमन झाल्याने शेतक-यांनी मूग, उडीद पिकांचा पे-यावर भर दिला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मूग आणि उडीदाच्या पे-यात दुप्पट वाढ झाली आहे. आज पर्यंत जिल्हयात खरीपाच्या ९९.९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच तूर, मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी ही पिके वाढीच्या आवस्थेत आहेत.
हवामान विभागाच्या अनुमानानुसार यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाल्याने खरीप हंगामातील पेरण्याही सध्या अंंतिम टप्यात आहेत. लातूर जिल्हयात सरासरी ७९१.६० मिली मिटर पाऊस पडतो. तो जून महिण्याच्या सुरूवातीपासूनच कोसळत असून आज पर्यंत जिल्हयात ४४३.२ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.
या पावसाच्यामुळे जिल्हयात आजर्यंत ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. आसून या मध्ये ४ लाख ९० हजार ९०६ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधीक पेरा झाला आहे. तसेच तूर ७१ हजार ४७५ हेक्टर, मूग ७ हजार १४१ हेक्टर, उडीद ५ हजार ९४४ हेक्टर, ज्वारी ३ हजार ८२७ हेक्टर, बाजरी २०९ हेक्टर, मका २३ हजार ७०८ हेक्टर, भात ३७ हेक्टर, भुईमुग १७३ हेक्टर, तीळ १४७ हेक्टर, कारळे ५८ हेक्टर, सुर्यफूल २८ हेक्टर पेरणी झाली आहे. तर कापूस १ लाख ६२ हजार ३८८ हेक्टरवर लागवड झाली आहे.
दरवर्षी पावसाचे उशिराने आगमन होत असल्याने जिल्हयात मुग, उडीदाचा पेरा कमी होत होता. मात्र यावर्षी पाऊस वेळेत दाखल झाल्याने मुग व उडीदाचा पेरा दरवर्षापेक्षा यावर्षी वाढला आहे. गेल्यावर्षी मूगाचा ४ हजार ४४३ हेक्टर पेरा झाला होता. तर यावर्षी मूगाचा ७ हजार १४१ हेक्टर पेरा झाला आहे. गेल्यावर्षी पेक्षा ३ हजार हेक्टरने मुगाचा पेरा वाढला आहे. तसेच गेल्यावर्षी उडीदाचा २ हजार ९५४ हेक्टर पेरा झाला होता. तर यावर्षी उडीदाचा ५ हजार ९४४ हेक्टरवर पेरा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ हजार हेक्टरने पेरा वाढला आहे.