23.2 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रशिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे

शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे

सांगली : प्रतिनिधी
श्री शिवप्रतिष्ठानने बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ २५ ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा बंदचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचाराच्या बाबतीत येत्या काही दिवसांत कारवाई झाली नाही तर पुढे निर्णय घेतला जाईल, असे श्री शिवप्रतिष्ठानने म्हटले आहे.

२४ ऑगस्ट रोजी मविआकडून पुकारण्यात आलेला बंद आणि २५ ऑगस्ट रोजी काही परीक्षा असल्याने लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवप्रतिष्ठानने २४ ऑगस्ट रोजीचा बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेत शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्ह्यात २५ ऑगस्ट रोजी ‘बंद’ची हाक दिली होती. संभाजी भिडे म्हणाले होते की, बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबवायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे. बांगलादेशमधील हिंदू लोकांचे स्थलांतर अजिबात होता कामा नये. त्यांना बांगलादेशमध्ये सुरक्षा मिळायला हवी. सगळ्या हिंदू राजकारण्यांनी या गोष्टी घडल्यानंतर पेटून उठायला हवे असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR