28.5 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, आता जशास तसे उत्तर देणार

फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, आता जशास तसे उत्तर देणार

जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचं वाटोेळं करायला लागले असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
आमचा रस्ता बंद केला आहे. गावातून जाऊ दिलं जात नाही. सध्या मराठ्यांचं शोषण सुरू असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. आता मराठ्यांना वाळीत टाकल्याचे जरांगे म्हणाले. मराठा समाज अन्याय सहन करणार नाही. आम्ही देखील जशास तसे उत्तर देणार असल्याचे जरांगे म्हणाले.

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण मारले आहे. हे जर मराठा समाजाने केले असते तर छगन भुजबळ यांनी किती थयथयाट केला असता असे जरांगे म्हणाले. आता सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मराठा करणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला. आता आमचे रस्ते बंद केलेत, काही दिवसांनी आम्ही देखील तुमचे रस्ते बंद करू असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंमलबजावणी केल्याशिवाय हे आमरण उपोषण सुटणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आणि ओबीसी वाद नाही
मराठा आणि ओबीसी वाद नसल्याचे मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांनी शांत राहावे असे आवाहन मी करत असल्याचे जरांगे म्हणाले. मराठा-ओबीसी कधीच भांडत नाहीत. हे छगन भुजबळांनी केलं असल्याचे जरांगे म्हणाले. मराठ्यांना आरक्षण दिल्यावर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. त्यामुळे भांडण वाढवण्याची गरज नाही. मराठ्यांच्या नोंदी सापडल्यावर त्यांना आरक्षण दिले पाहिजे हे ओबीसींना समजते असे जरांगे पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR