27.2 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रविजेचा धक्का लागून ३ ठार

विजेचा धक्का लागून ३ ठार

सांगली : प्रतिनिधी
जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असलेल्या म्हैसाळ येथे विजेचा धक्का लागून तीन जणांचा मुत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज रविवारी सकाळी घडली. एकाच गावातील तीन युवकांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे.

म्हैसाळ गावात वनमोरे कुटुंबीयांची शेती आहे. आपल्या शेतात दैनंदिन कामासाठी वनमोरे कुटुंबातील सदस्य दररोज ये-जा करत असतात. आज सकाळी शेतात पाणी देण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते. त्यावेळी विजेची वायर तुटून शेतात पडली होती. मात्र, शेतातून चालत असताना त्यांच्या लक्षात न आल्याने पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचा मुलगा शाहीराज वनमोरे हा वडील पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहीराजलाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामध्ये, त्याचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

मृतांमध्ये प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय (३५), पारसनाथ वनमोरे वय (४०), शाहीराज पारसनाथ वनमोरे वय (१२) अशी मृतांची नावे आहेत. तर हेमंत वनमोरे (वय १५)हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर महावितरणच्या अधिका-यांशी संपर्क साधण्यात आला असून ग्रामस्थांनी महावितरणविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR