24.2 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeलातूरशेतक-यांच्या सोयाबीनच्या गंजी पाण्यात

शेतक-यांच्या सोयाबीनच्या गंजी पाण्यात

पोहरेगाव : वार्ताहर
तालुक्यातील भोकरंबा, मोटेगाव आणि मोरवड परिसरात शनिवरी २० (आक्टॉबर) मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या ढगफुटीने परिसरात नाल्याना पाणी आल्याने साधारण दीड-दोन हजार सोयाबीनचे क्षेत्रातील गंजी पाण्याखाली गेल्या आहेत. शेतक-याच्या हातातोंडांशी आलेला घास परतीच्या पाण्याने हिरावून घेतला आहे.
शनिवारी मध्यरात्री अचानक वादळी-वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अचानकपणे या पावसामुळे भोकरंबा, मोटेगाव, मोरवड आदी परिसरातील सोयाबीनच्या उभ्या शेतातील गंजी पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाण्याचा प्रवाहात काही शेतक-यांचे सोयाबीन नाल्याच्या पुरात वाहून गेले. शेतातील काळी माती, वळणे,जमीन अक्षरश: खरडून गेली आहे. सद्या मागील पंधरवड्यापासून भोकरंबा (रेणापूर) परिसरात सोयाबीन काढणीला वेग आला आहे.आवाच्या सव्वा भाव देऊन शेतक-यांंनी आपले सोयाबीन काढून पाण्यात भिजू नये म्हणून गंजी लावल्या होत्या पण या परिसरातील झालेल्या ढगफुटीच्या पावसामुळे सर्व गंजी पाण्यात उभ्या असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR