26.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रदमानियांच्या खात्यावर २५ कोटींचे रिचार्ज कोणी केले?

दमानियांच्या खात्यावर २५ कोटींचे रिचार्ज कोणी केले?

पुराव्यांसह उघड करण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

पुणे : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून वारंवार होणा-या विविध आरोपांमुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. जाणीवपूर्वक केलेल्या बदनामीकारक बाबींबद्दल दमानिया यांच्याविरुद्ध फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलेली असतानाच आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनीही दमानिया यांना आक्रमक इशारा दिला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर २५ खोक्याचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला १५ देश फिरणा-या आणि अडीच कोटी रुपयांचा टॅक्स भरणा-या स्वयंघोषित समाजसेविका ताई, कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे आम्ही पुराव्यांसह लवकरच बाहेर काढू असा इशारा सूरज चव्हाण यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दिला आहे. मुख्य सचिव तथा मंत्रिमंडळ सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांची मान्यता झाल्यानंतर दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त निर्गमित केलेले आहे.

त्यामध्ये कृषी विभागाच्या खरेदी व थेट पुरवठ्याला मान्यता देण्यात आलेली आहे. तो पेपर सोबत पोस्ट करत आहेत. ज्याला त्या तारीख नसलेले सहीचे पत्र म्हणतात ते वास्तविकत: मंत्री, कृषी म्हणून स्वत:च्या विभागाच्या सचिवांना निर्गमित केलेले टिपण आहे. टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघात नाही तथापि सदर टिपणावर ते ज्याला मार्क केलेले आहे त्याची स्वाक्षरी व त्याला प्राप्त झाल्याचा व कार्यासनात प्राप्त झाल्याचा दिनांक नमूद असतो. विशेष म्हणजे या शासन निर्णयान्वये व मंत्रिमंडळ निर्णयान्वये मान्यता प्राप्त झालेली खरेदी अद्यापही झालेली नाही. त्याची प्रक्रिया सुरू आहे. दमानिया ताई यांनी नेहमीप्रमाणे अर्धवट कागदपत्रांच्या आधारे जे आरोप केलेले आहेत ते संपूर्णत: खोटे व फक्त मीडिया ट्रायल करण्यासाठी आहेत असा दावा मुंडे यांनी केला आहे.

माझी बदनामी करण्याच्या हेतूने प्रेरित : मुंडे
कृषी खात्यातील कथित घोटाळ्यावरून अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना धनंजय मुंडेंनी म्हटले आहे की, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आणि सोलर लाईट ट्रॅप यांचा पुरवठा करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयावर अंजली दमानिया यांनी केलेले दावे हे संपूर्णपणे चुकीचे, खोटे व केवळ माझी बदनामी करण्याच्या हेतूने प्रेरित असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR