22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रविकासाची ध्यास घेतलेले शांत, संयमी नेतृत्व

विकासाची ध्यास घेतलेले शांत, संयमी नेतृत्व

मुंबई : विकासाची ध्यास घेतलेले शांत, संयमी नेतृत्व म्हणून आमदार राजेंद्र पाटणी सदैव स्मरणात राहतील. त्यांचे अकाली निधन दु:खद असल्याची भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार पाटणी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आमदार पाटणी लढवय्ये होते. पण आजाराने त्यांच्यावर मात केली. समाजकारण आणि राजकारणातील त्यांची धडाडी सर्वपरिचित आहे. विधानपरिषद, विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी वाशिम जिल्हा आणि कारंजा मतदार संघाच्या विकासाचा ध्यास घेतला होता. त्यांच्या अकाली निधनाने पाटणी कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांवर आघात झालेला आहे. त्यांना यातून सावरण्याचे बळ मिळावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात आमदार राजेंद्र पाटणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR