31.7 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeमहाराष्ट्रशिर्डीला जाणा-या कुटुंबावर काळाचा घाला; २ ठार

शिर्डीला जाणा-या कुटुंबावर काळाचा घाला; २ ठार

जोडप्याचा जागीच मृत्यू; ५ जण जखमी

जालना : जालना जवळील वडीगोद्री येथे विरुद्ध दिशेने वेगाने येणा-या हायवाने समोरून येणा-या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली.

या अपघातात हैदराबाद येथील दांपत्याचा मृत्यू झाला आहे. हैदराबाद येथून ते शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात असतानाच हा अपघात झाला. जी रामू (४५), जी माधुरी (४०) असे मृतांचे नाव आहे. तर श्रीवाणी (४१), अनुषा (१७), मेघना(१२), ऋषिकेश (०७), नागेश्वर राव (४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. हैदराबाद येथील हे कुटुंब किया कॅरेन्स या गाडीने रविवारी दुपारी १२ वाजता शिर्डीसाठी निघाले होते. तिथून येत असताना धुळे सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने विना नंबरप्लेटच्या भरधाव हायवाने कारला जोराची धडक दिली. यात दोघांचा दुर्दैवी अंत झाला.

अपघात होताच स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. कारमधील मृतदेह व जखमींना बाहेर काढणे कठीण झाले होते. तेव्हा जेसीबीचीह मदत घ्यावी लागली. यावेळी रुग्णवाहिका देखील तातडीने दाखल झाली व मृतदेह तसेच जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील खंजि रुग्णालयात दाखल केले. या घटनेने हैदराबाद येथील कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR