22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रनगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; ६ ठार

नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; ६ ठार

अहमदनगर : नगर-कल्याण महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ठाणे-मेहकर एसटी बस आणि इको गाडी यांचा भीषण अपघात झाला. ढवळपुरी फाट्यानजीक आज बुधवारी (२४ जानेवारी) पहाटे २.३० वाजता भीषण आपघात झाला असून यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तर एकाचा अहमदनगर येथे उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे. स.पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ आणि टीम घटना स्थळी दाखल झाली असून अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यात आली.

सध्या अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला केली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. दरम्यान, अपघातग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

निलेश रावसाहेब भोर (दसवडे), जयवंत रामभाऊ पारधी (जांबुत खुर्द), संतोष लक्ष्मण पारधी (जांबुत खुर्द), प्रकाश रावसाहेब थोरात (वारणवाडी), सचिन कांतीलाल मंडलीचा (टाकळी मानूर), अशोक चिमा केदार (जांबुत खुर्द) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, सुयोग अडसूळ नावाचा तरुण या अपघातात जखमी झाला आहे.

अपघातातील जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR