26.6 C
Latur
Saturday, May 24, 2025
Homeराष्ट्रीयराजस्थान सरकारचे खाते वाटप; भजनलाल यांच्याकडे ८ मंत्रालये

राजस्थान सरकारचे खाते वाटप; भजनलाल यांच्याकडे ८ मंत्रालये

जयपूर : राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या मंत्रीपरिषदेच्या खात्यांचे विभाजन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गृह विभागासह आठ खात्यांचा कार्यभार सांभाळणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्याकडे वित्त, पर्यटन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची (पीडब्ल्यूडी) जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांच्याकडे शिक्षण, वाहतूक आणि आयुर्वेद हे सहा विभाग सोपवण्यात आले आहेत.

आमदार राज्यवर्धन राठोड राजस्थानचे उद्योगमंत्री बनले आहेत. तर गजेंद्र सिंह खिमसर यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोटाचे आमदार मदन दिलावर, ज्यांची आरएसएसशी जवळीक आहे, त्यांच्याकडे शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. बहुतांश नेते पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. काँग्रेसला सत्तेवरून हटवून भाजपचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर १५ दिवसांनी विभागांची घोषणा करण्यात आली आहे. अशी अटकळ बांधली जात आहे की भाजपने जबाबदारीची यादी काळजीपूर्वक निवडली आहे, त्यामुळेच ही बहुप्रतिक्षित घोषणा करण्यास इतका वेळ लागला.

उल्लेखनीय आहे की राजस्थानमधील मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार शनिवारी झाला, जेव्हा १२ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्री करण्यात आले. यापैकी पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आहेत. यापूर्वी शर्मा यांनी १५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत नवनिर्वाचित आमदार दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR