30.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeराष्ट्रीयएअर इंडियाला १० लाख रुपयांचा दंड

एअर इंडियाला १० लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रवाशांच्या सुविधांशी संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल एअर इंडियाला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिल्ली, कोची आणि बेंगळुरू विमानतळावरील तपासणीनंतर, नियामकाने सांगितले की एअर इंडिया नागरी विमान वाहतूक आवश्यकता (सीएआर) च्या तरतुदींचे पालन करत नाही.

या संदर्भात एअर इंडियाला ३ नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. बुधवारी जारी केलेल्या निवेदनात डीजीसीएने म्हटले आहे की एअर इंडियाच्या प्रतिसादाच्या आधारे असे आढळून आले की एअरलाइनने नियमांचे पालन केले नाही. यामध्ये प्रवाशांना उड्डाण विलंबावर हॉटेल न देणे, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना नुकसान भरपाई न देणे आणि त्यांच्या ग्राउंड स्टाफला प्रशिक्षण न देणे इत्यादींचा समावेश आहे. डीजीसीएने प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरविण्यासह इतर नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR