24 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeराष्ट्रीयअमेरिकेने आणखी १५७ भारतीयांना केले हद्दपार

अमेरिकेने आणखी १५७ भारतीयांना केले हद्दपार

भारतीयांना बेड्या घालून पाठविले मायदेशी शनिवारी ११६ जणांना पाठविले

अमृतसर : अमेरिकेने बेकायदेशीरपणे राहणा-या १०४ भारतीयांना ५ फेब्रुवारी रोजी जबरदस्तीने परत पाठवण्यात आले होते. त्यानंतर शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी ११६ जणांना अमृतसर येथे पाठविण्यात आले आणि रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी १५७ जणांची तिसरी तुकडी पाठविण्यात आली असून यामध्ये, मुले वगळता पुरुष आणि महिलांना हातकड्या आणि बेड्या घालून बांधण्यात आले होते. तिसरी तुकडी रविवारी रात्री १० वाजता पोहोचेली.

अमेरिकेने बेकायदेशीरपणे राहणा-या आणखी ११६ भारतीयांना जबरदस्तीने हद्दपार केले. यावेळी, महिला आणि मुले वगळता सर्व पुरुषांना हातकड्या घालून शनिवारी रात्री ११.३० वाजता अमेरिकन हवाई दलाच्या विमान ग्लोबमास्टरमध्ये अमृतसर विमानतळावर उतरवण्यात आले. त्यांना विमानतळावर त्यांच्या कुटुंबाला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. सुमारे ५ तासांच्या पडताळणीनंतर, सर्वांना पोलिसांच्या वाहनांमधून घरी सोडण्यात आले. यावेळी कोणालाही माध्यमांशी बोलण्याची परवानगी नव्हती. यापूर्वी, ५ फेब्रुवारी रोजी १०४ अनिवासी भारतीयांना जबरदस्तीने परत पाठवण्यात आले होते. यामध्ये, मुले वगळता पुरुष आणि महिलांना हातकड्या आणि बेड्या घालून बांधण्यात आले. तिसरी तुकडी रविवारी रात्री १० वाजता पोहोचेली.

यामध्ये १५७ अनिवासी भारतीय होते. शनिवारी जबरदस्तीने परत पाठवण्यात आलेल्यांमध्ये पंजाबमधील ६५, हरियाणातील ३३, गुजरातमधील ८, उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील प्रत्येकी २ आणि हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी १ जणांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतेक १८ ते ३० वयोगटातील आहेत.

सर्वाधिक पंजाबी परतले
मागील तुकडीबाबत, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रश्न उपस्थित केला होता की जेव्हा जास्तीत जास्त लोक (प्रत्येकी ३३) हरियाणा आणि गुजरातचे होते, तेव्हा विमान अहमदाबाद किंवा अंबालाऐवजी पंजाबमध्ये का उतरवण्यात आले? तथापि, या बॅचमध्ये सर्वाधिक पंजाबी परतले.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यापूर्वीच त्यांचे स्वागत करण्यासाठी अमृतसर विमानतळावर पोहोचले होते परंतु विमानाच्या आगमनात उशीर झाल्यामुळे ते परतले. यानंतर, पंजाब सरकारमधील दोन मंत्री कुलदीप धालीवाल आणि हरभजन सिंग ईटीओ यांनी पंजाबच्या तरुणांचे स्वागत केले.

नागरिकांना कैदी बनवून पाठविले
मंत्री कुलदीप धालीवाल पहाटे १ वाजता अमृतसर विमानतळावर पोहोचले आणि म्हणाले की, हरियाणा सरकारने अमेरिकेतून हद्दपार केलेल्या आपल्या लोकांसाठी कैद्यांनी भरलेली बस पाठवली याबद्दल त्यांना खूप दु:ख झाले. त्यांनी हरियाणा वाहतूक मंत्री अनिल विज यांना सांगितले की पंजाबने चांगली वाहने तैनात केली आहेत. विज हे परिवहन मंत्री आहेत, त्यांनी एक चांगली बस पाठवायला हवी होती. हरियाणातील कोणताही मंत्री, आमदार किंवा भाजप नेता येथे आला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR