23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रशेतक-यांना कधीही वा-यावर सोडणार नाही

शेतक-यांना कधीही वा-यावर सोडणार नाही

- इथेनॉलसंदर्भात अमित शाहांची घेणार भेट

मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात विधानसभेत अवकाळीसंदर्भात चर्चा होणार आहे. कांद्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस पियुष गोयलांना, तर मी इथेनॉलसंदर्भात नितीन गडकरींना भेटल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सरकार शेतक-यांना कधीही वा-यावर सोडणार नाही. जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे प्रयत्न केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना दिले

अजित पवार म्हणाले, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक होणार आहे. अवकाळी पावसामुळे आतापर्यंत साडेसात लाख हेक्टवर नुकसान झालेलं आहे आज विधानसभेत अवकाळीसंदर्भात चर्चा होणार आहे. इथेनॉलसंदर्भात मी गडकरींना भेटलो. आपण यासंदर्भात सोमवार किंवा मंगळवारी तिथे जाऊन भेटू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सध्या आपल्यासमोर दुष्काळी, अवकाळी, कांदा, इथेनॉलसंदर्भात महत्वाचे प्रश्न आहे.

पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय नुकसानाचे आकडे पुढे येणार नाहीत
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. सगळ्या पालकमंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात जाऊन अवकाळीच्या नुकसानची पाहणी करण्यास सांगितले होते. अनेक जिल्हाधिका-यांशी मी बोललो, तर त्यांनी सांगितलं की वॉरफुटिंगवर आमचे काम सुरू आहे. पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय नुकसानाचे आकडे पुढे येणार नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR