22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रआपत्ती व्यवस्थापन टीमने वाचवले पाच जणांचे प्राण

आपत्ती व्यवस्थापन टीमने वाचवले पाच जणांचे प्राण

पौड : पुण्यात मागच्या २४ तासांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यातच अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मुळशीतील आपत्ती व्यवस्थापन टीमने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

वळकी नदीने आपली पातळी ओलांडली असून जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून सावरगाव (ता. मुळशी) येथे नदीच्या किनारी एका गोठ्यात अडकलेल्या पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन टीमला यश आले आहे. यामध्ये एक महिला, एक पुरुष व तीन मुलांना सुखरूप स्थळी हलविण्यात आले आहे.

यावेळी स्थानिक पातळीवर असलेले प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी हजर नसल्याचे दिसून आले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मुळशीचे प्रमोद बलकवडे, गोरख माझिरे व आपत्ती व्यवस्थापनची टीम उपस्थित होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR