25.4 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeअंतरराष्ट्रीयजगभरात उष्णतेचा धोका ३५ पटीने वाढला

जगभरात उष्णतेचा धोका ३५ पटीने वाढला

शास्त्रज्ञांचे अभ्यासातील निष्कर्ष भविष्यवेत्ता नॉस्ट्रेदामस यांचे भाकित खरे ठरले

वॉशिंग्टन : गेली अनेक वर्षे वाढत असलेल्या तापमानवाढीमुळे जीवघेणी गरमी वाढण्याचे प्रमाण तब्बल ३५ पट वाढल्याचे जागतिक तापमानवाढीबाबत अभ्यास करणा-या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांच्या गटाने केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे. सर्वांची चिंता वाढविणारा अहवाल समोर आला असून यंदाच्या उन्हाळ्यात भारतात तसेच जगाच्या इतर भागात मिळून हजारो लोकांचे बळी गेले आहेत.

अहवालात असेही म्हटले आहे की, चालू वर्ष आजवरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील बहुतेक प्रदेशांमध्ये पावसाळ्याचे आगमन होण्याच्या आधीच भीषण उष्णतेचा प्रकोप झालेला पहायला मिळतो. दरम्यान जगविख्यात भविष्यवेत्त्याने ४५० वर्षांपूर्वी त्याचे पुस्तक लेस प्रोफेटीजÞमध्ये जगातील अशा काही घटनांचे भाकीत केले आहे की त्या वेळोवेळी ख-या ठरत आल्या आहेत. २०२४ मध्येही काय काय घडेल याचा अर्थ त्याच्या अनुयायांनी लावला होता. हा भविष्यवेत्ता नॉस्ट्रेदामस होता. त्याने २०२४ मध्ये उष्णतेची लाट येईल, हवामान बदल होऊन दुष्काळ पडेल असे म्हटले होते.

आता संपूर्ण भारत उन्हाच्या लाटांत होरपळत आहे. तर सौदीमध्ये देखील उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. नॉस्ट्रेदामसने गेल्या १०० वर्षांसाठी जर्मनीत अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या उदयापासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यावर गोळीबार आणि २०२२ मध्ये जगण्याच्या संकटापर्यंत अशा अनेक गोष्टींवर भाकिते केली होती. यापैकी बरीच खरी ठरली आहेत. सात महिन्यांचे एक मोठे युद्ध होईल, ज्यामध्ये लोक त्यांच्या वाईट कृत्यांमुळे मरतील आणि रौएन आणि एव्हरेक्स राजाच्या अधीन राहणार नाहीत असे नॉस्ट्रेदामसने म्हटले आहे. याच काळात दोन युद्धे सुरु झाली आहेत.

भविष्यात धोका वाढणार?
– उष्णता मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना हीट स्ट्रोकचा त्रास होतो. यात शरीराला थंड ठेवणारी यंत्रणा पूर्णपणे मोडून पडते. वेळीच उपाय न केल्यास व्यक्तीचा मृत्यू ओढवतो.
– दुसरीकडे संपूर्ण जगभर हरितगृह वायू मोठ्या प्रमाणात वाढ आहे. जीवष्म इंधन जाळल्याने मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण केली जात आहे. यामुळे भविष्यात जीवघेणी उष्णता निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

कसा केला अभ्यास?
– या अभ्यासासाठी वर्ल्ड वेदर अ‍ॅट्रिब्युशन (डब्ल्यूडब्ल्यूए) नेटवर्कने मेक्सिको, दक्षिण पश्चिम अमेरिका, ग्वाटेमाला, बेलीज, अल साल्वाडोर आणि होंडुरास देशांची निवड केली होती.
– डब्ल्यूडब्ल्यूए यात उत्तर गोलार्धातील सर्वाधिक उष्ण पाच दिवस आणि पाच रात्रीचा अभ्यास केला. जीवाष्म जाळल्याने निर्माण होणा-या उष्णतेमुळे जागतिक तापमानात वाढ वेगाने होत असल्याचा निष्कर्ष पाहणीतून काढण्यात आला आहे.
– ग्लोबल वाढीसाठी कारणीभूत ठरणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व देशांच्या सरकारने विविध उपाययोजना केल्या पाहिजेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR