21.3 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयबक्कळ पगाराचे आयआयटीयन्स झाले बेरोजगार!

बक्कळ पगाराचे आयआयटीयन्स झाले बेरोजगार!

७००० हून अधिकांना नोकरी मिळेना देशातील कंपन्या घेतायेत हात आखडता

नवी दिल्ली : दरवर्षी कोटी कोटींमध्ये पगार असलेल्या नोक-या मिळविणा-या आयआयटीच्या हुशार पोरांना यंदा कोणी विचारेनासे झाले असून २०२४ मध्ये पासआऊट झालेले सुमारे ७००० विद्यार्थी नोकरीविना बेरोजगार झाल्याची माहिती समोर आली आहे. आयआयटीच्या दारात रांगा लावणा-या कंपन्यांनी हात आखडते घेतल्याने आयआयटी प्लेसमेंटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

देशभरात २३ आयआयटी आहेत. या संस्थांमधील जवळपास ३८ टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच मिळालेली नाही. आयआयटी कानपुरच्या माजी विद्यार्थ्याने आरटीआयद्वारे याची माहिती मागितली होती. यामध्ये ही धक्कादायक आकडेवारी आली आहे. देशात कमालीची बेरोजगारी असल्याची आकडेवारी नुकतीच आली होती. यात आयआयटीच्या लोकांनाही कोणी नोक-या देईना म्हटले तर नवल वाटायला नको असे माहिती अधिकारातल्या आकडेवारीवरून वाटत आहे.

आयआयटी दिल्लीने आपल्या माजी विद्यार्थ्यांना मेल करून २०२४ च्या विद्यार्थ्यांना नोकरी बघण्यास व कंपन्यांकडे रेफरन्स देण्याबाबत कळविले आहे. एवढेच नाही तर आयआयटी मुंबई, बिर्ला इन्स्टिट्यूट यांनी देखील आपल्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आहे.

दरम्यान देशातल्या एकूण बेरोजगारांपैकी सुमारे ८३% हे तरूण बरोजगार आहेत आणि त्यांच्यातही सुशिक्षित बेरोजगार माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढल्याचे एका अहवालातही सांगण्यात आले आहे.

आयआयटीसमोर मोठे आव्हान
दिल्ली आयआयटीने यंदाचे प्लेसमेंट संपत आले तरी आमच्यासमोर मोठे आव्हान आहे. आम्ही अनेक प्रयत्न केले तरी ४०० विद्यार्थ्यांना अजून नोकरी मिळालेली नाही. यामुळे आम्ही माजी विद्यार्थ्यांना संपर्क करत आहोत असे मेलमध्ये म्हटले आहे. तुमची मदत मिळाली तर विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकेल आणि ते करिअर सुरु करू शकतील, असे यामध्ये नमूद केले आहे.

अनेक संस्थेत प्लेसमेंट सुरूच
बिर्ला इन्स्टिट्यूटने दोन महिन्यांपूर्वीच माजी विद्यार्थ्यांना संपर्क केला होता. मुंबई आयआयटीमध्ये प्लेसमेंट अजून सुरु आहे. ती जूनच्या अखेरपर्यंत चालू राहणार आहे. अद्याप २५० विद्यार्थ्यांना नोकरी मिळालेली नाही. २३ आयआयटीमध्ये ७,००० हून अधिक आयआयटी विद्यार्थ्यांना या वर्षी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोक-या मिळू शकलेल्या नाहीत.

दोन वर्षांत दुपटीने वाढ
दोन वर्षांपूर्वी ही संख्या ३,४०० होती. चॅटजीपीटीचे हे पहिले परिणाम करणारे वर्ष आहे. दोन लोक तीन लोकांचे काम करू शकत असतील, तर आम्ही आधीच ३०% ने भरती कमी केली आहे. तसेच आधीच भरती खूप झाली आहे. शिवाय निवडणुका आहेत. यामुळे या सरकारांची धोरणे पाहून कंपन्या पुढील निर्णय घेणार आहेत. यामुळे कंपन्यांनी थांबा आणि पहा अशी भुमिका घेतल्याचे बिट्स समुहाचे अध्यक्ष व्ही रामगोपाल राव यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR