33.3 C
Latur
Tuesday, June 3, 2025
Homeमहाराष्ट्रजगात मानवता हा एकच धर्म, सध्या त्याला हिंदू म्हणतात

जगात मानवता हा एकच धर्म, सध्या त्याला हिंदू म्हणतात

दृष्टांचे निर्दालन झालेच पाहिजे मोहन भागवत यांची मागणी

मुंबई : वेगळेपणाला धरून जेव्हा जातो त्यावेळी समाजातील अंतर वाढते. एकतेच्या सूत्राला धरुन चालले की आपलेपणा वाढतो. जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता. त्यालाच आपण हिंदू असे म्हणतो असे मोहन भागवत म्हणाले. यावेळी क्रोध आहे आणि अपेक्षाही आहे. ती पूर्ण होईल असे मोहन भागवत म्हणाले. ते मुंबईमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यावर मोहन भागवतांनी भाष्य केले. आपण सगळे एक असून तर कुणीही आपल्याकडे डोळे वाकडे करुन बघणार नाही असे ते म्हणाले. मोहन भागवत म्हणाले की, लढाई ही धर्माची आणि अधर्माची आहे. काल धर्म विचारून मारले. हिंदू असे कधीही करणार नाही. आपल्या मनात दुख आहे. आमच्या मनात क्रोध आहे. असुरांचे निर्दालन व्हायचे असेल तर अष्टभुजांची शक्ती असलीच पाहिजे. रावण त्याचे मन, बुद्धी बदलायला तयार नव्हता. दुसरा उपायच नव्हता. रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला.

मोहन भागवत पुढे म्हणाले की, आता क्रोधही आहे आणि अपेक्षाही आहे. यावेळी अपेक्षा पूर्ण होईल असेही वाटते. समाज एक असेल तर कुणी डोळे वाकडे करुन पाहणार नाही. वाकडे कुणी पाहीले तर डोळा फुटेल. त्याला दमदार उत्तर देऊ अशी अपेक्षा. द्वेष, शत्रुता हा आपला स्वभाव नाही. तसा मार खाणे हाही आपला स्वभाव नाही. शक्तिवान माणसाने अहिंसक असले पाहिजे. शक्तिहिनाला त्याची गरज नाही. शक्ती आहे ती अशा वेळी दिसली पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR