32.5 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeसोलापूरसगेसोयरेंचा अध्यादेश काढलात तर आम्ही मुंबई जाम करू : हाके

सगेसोयरेंचा अध्यादेश काढलात तर आम्ही मुंबई जाम करू : हाके

सांगोला : मुख्यमंत्री राज्यातील १२ कोटी समाजाचे नेतृत्व करीत असून आम्ही ६० टक्के ओबीसींनी त्यांना मते दिली आहेत. त्यांनी सगेसोयरेंचा अध्यादेश काढू नये अन्यथा आम्ही राज्यातील सर्व ओबीसी मुंबईत येऊन मुंबई जाम करू, असा इशारा प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला.

प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे दोन्ही ओबीसी नेते सांगोल्यात आले असता त्यांचे येथील ओबीसी बांधवांनी फटाके वाजवून, हलगीच्या कडकडाटात जोरदार स्वागत केले. याप्रसंगी हाके बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक शिवाजी बनकर, दादासाहेब लवटे, डॉ. प्रभाकर माळी, अ‍ॅड. सचिन देशमुख, उल्हास धायगुडे, दत्तात्रय जानकर, सोमनाथ राऊत आदी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नवनाथ वाघमारे म्हणाले, जुजारपूर गावातून प्रा. लक्ष्मण हाके यांच्या रूपाने ओबीसी समाजाला हिरा मिळाला, असे सांगून ओबीसी आरक्षणाला पाठिंबा का दिला नाही म्हणून आजी-माजी लोकप्रतिनिधी जाब विचारा, असे सांगितले. प्रा. हाके यांनीही सत्कार, सन्मान केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने जुजारपूर ग्रामस्थ उपस्थित होते.

जरांगे, तुम्हाला २८८ आमदार पाडायचे आहेत, तर सुरुवात मुख्यमंत्र्यांपासून करून शेवट सांगोला येथील शहाजीबापू यांच्यापर्यंत करा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, अशी भूमिका प्रा. लक्ष्मण हाके यांनी यावेळी घेतली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR