30.6 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइराण, पाकिस्तान आमने-सामने

इराण, पाकिस्तान आमने-सामने

इराणने घरात घुसून मारले तरी कळलेही नाही ऐन महागाईत इराणचा पाकवर हल्ला

इस्लामाबाद : ९०९ किमी लांबीच्या सीमेवर इराण आणि पाकिस्तानचे सैन्य समोरासमोर आले आहे. सैनिक आणि शस्त्रात्रे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात जमा झालेत. एकीकडे इराणचा सिस्तान प्रांत आहे तर दुसरीकडे पाकिस्तानचा बलूचिस्तान प्रांत या सीमेला लागून आहे. ही जागा कुह ए मलिक सालीह डोंगराळ भाग आहे. या भागाच्या दक्षिण पश्चिमेस तहलब नदी आणि पूर्वेकडे मश्किल नदी आहे. दक्षिणेच्या दिशेला नहंग नदी असून डोंगराच्या पलीकडे तुम्ही ग्वादर खाडी आणि अमन खाडीपर्यंत जाऊ शकता.

या भागासाठी इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात कायम संघर्ष असतो. १८ व्या शतकात ब्रिटीश सरकारने भारताच्या बहुतांश भागावर कब्जा केला होता. पाकिस्तान तेव्हा भारताचा भाग होता. तेव्हा १८७१ मध्ये ब्रिटीश सरकार आणि इराण यांच्यात सीमा करार होऊन दोन्ही देशांची सीमा निश्चित केली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान वेगळा झाला. पाकिस्तानने इराणसोबत १९५८-५९ मध्ये सीमा आखून घेतली. त्या मैदानात पिलर्स उभे केले. जून २०२३ मध्ये या सीमेजवळ एक दहशतवादी हल्ला झाला. त्यात पाकिस्तानी सीमेवर तैनात काही सैनिक मारले गेले. त्यानंतर काही दिवसांत याच सीमेवर इराणच्या बाजूस दहशतवादी हल्ला झाला. त्यात ५ इराणी सैनिक मारले गेले.

इराणने २०११ मध्ये त्यांच्या सीमेवर फेंिसगचे काम सुरू केले होते. ज्यात ३ फूट मोठी आणि १० फूट उंची सिमेंटची भिंत बांधून घेतली. ज्याच्या चहुबाजूने स्टील रॉड्स लावले. ही भिंत ताफ्तानपासून मांडपर्यंत ७०० किमीपर्यंत बनवली. पाकिस्तानने २०१९ मध्ये फेंिसग सुरू केली. जानेवारी २०२२ पर्यंत पाकिस्तानने त्यांच्या सीमेच्या ९० टक्क्यापर्यंत फेंिसगने सुरक्षित केले. पाकिस्तानहून इराणला ४ रस्ते जातात. हे चारही रस्ते सुरु आहेत. ताफ्तान ते मिरजावेह, ग्वादर ते चाबहार, मांड ते पिशिन आणि चादगी ते कुहक असे चार रस्ते आहेत. हे सर्व रस्ते बलूचिस्तानच्या सिस्तानच्या दिशेने जातात. दरम्यान, ९०९ किमी लांब या सीमेच्या दोन्ही बाजूने रहिवाशी वस्त्या आहेत. इराणच्या बाजूस १४ गाव आहेत तर दुसरीकडे पाकिस्तानच्या बलूचिस्तान इथं ११ गाव आहेत.

पाकिस्तान आणि इराण यांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यानंतर चीनने दोन्ही मित्र देशांना तणाव
संपविण्याचे आवाहन केले आहे. मात्र, चीनला अगदी जवळचा मित्र म्हणवणा-या पाकिस्तानला मोठा धोका मिळाला आहे. खरे तर, पाकिस्तानने मिसाइल्स आणि ड्रोनला रोखण्यासाठी मेड इन चायना राडार बसवले आहेत. मात्र हे रडार इराणच्या मिसाईल आणि ड्रोन्सना रोखण्यात अपयशी ठरले. अर्थात इराणने घरात घुसून मारले, तरी पाकिस्तानला कळले नाही. यामुळे पाकिस्तान नाराज झाला आहे. एवढेच नाही, तर इराणने हल्ला केला, पण चीनने त्याची साधी ंिनदाही केली नाही. चीनच्या अशा वर्तनाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तान इराण संबंध बिघडले
इराणच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने तेहरानमधील आपल्या राजदूताला परत बोलावले. तसेच, इराणच्या राजदूतालाही पाकिस्तानात परतण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भा बोलताना पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाल्या होत्या, पाकिस्तानने आपल्या राजदूताला परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच, इराणच्या राजदूताला पाकिस्तानात परत येण्याची परवानगी दिली नाही. ते सध्या इराणमध्येच आहेत. त्यांना काही काळ पाकिस्तानात येता येणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR