28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रजय शहांचे विराटपेक्षा जास्त सिक्सर, सचिनपेक्षा जास्त शतके?

जय शहांचे विराटपेक्षा जास्त सिक्सर, सचिनपेक्षा जास्त शतके?

घराणेशाहीच्या आरोपांवरून संजय राऊतांचे अमित शहांना प्रत्युत्तर

मुंबई : प्रतिनिधी

इंडिया आघाडीमध्ये घराणेशाही आहे, हा अमित शहांचा आरोप हास्यास्पद आहे. घराणेशाही तर भाजपानेच पोसली. जय शहांना बीसीसीआयचे अध्यक्ष कोणत्या आधारे केले? अमित शहा गृहमंत्री नसते तर जय शहा बीसीसीआयमध्ये दिसले तरी असते का? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी अमित शहांवर टीका केली. ‘मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं. घराणेशाहीवाले सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेत’, अशी टीका गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. यांच्या या टीकेला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी अमित शहांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. घराणेशाहीची गोष्ट करता, जय शहा आपल्या घराण्याचे नाहीत का, जय शहा आपले चिरंजीव आहेत, त्यामुळे ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर ठोकले की सचिनपेक्षा जास्त शतकं आहेत त्यांची ? की कपिल देव यांच्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या त्यांनी? असा सवाल राऊत यांनी विचारला. कोणाच्या घराणेशाहीवर आपण बोलतायत, ठाकरे आणि पवारांची घराणेशाही देशाला आणि समाजाला कायम निर्णयदायी दिशा देणारी आहे, इथे कोणाला मुख्यमंत्री बनायचं नाही. माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचं आहे पण मी अजून सांगतो नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. सत्तेचा सारीपाट तुमच्या इशा-यावर चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

ठाकरे कुटुंबाचे मोठे योगदान
महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी ठाकरे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. या घराण्याचे लाभार्थी नरेंद्र मोदी आणि अमित शहासुद्धा आहेत हे त्यांनी आपल्या मनाला विचारावे, बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे. त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षाने वारंवार घेतलेला आहे, बाळासाहेब ठाकरे जर नसते तर भारतीय जनता पार्टी राज्यात औषधालाही दिसली नसती, बाळासाहेबांचे आणि त्यांच्या घराण्याचे बोट धरून राज्यात भाजप पक्ष वाढलेला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR