24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमोदींचा आत्मविश्वास ढळला

मोदींचा आत्मविश्वास ढळला

पृथ्वीराज चव्हाणांचा दावा! मतभेद विसरून महाआघाडीचे काम करण्याचे आवाहन

पाटण : ‘भाजपचे सरकार दबाव तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करून विरोधी पक्षांना वेठीस धरत आहे आहे. मागील निवडणुकीत दिलेल्या वचनाची पूर्तता करता येत नाही. काँग्रेस पक्षाला दंडाची नोटीस काढली आहे. पक्षाचे उत्पन्न जेवढे नाही त्याहून अधिक दंड ठोठावला आहे. देशात आताचे वातावरण पाहून नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला.

‘‘केंद्रात भाजप सरकार परत सत्तेवर आले, तर लोकशाही आणि राज्य घटना जिवंत राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपण सर्वांनी एकत्र येऊन शरद पवार जो उमेदवार देतील त्याचे काम एकजुटीने करूया. आपल्यातील मतभेद विसरून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी एकदिलाने काम करूया,’’ असे आवाहनही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

काळोली येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मेळाव्यास माजी मंत्री विक्रमंिसह पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितंिसह पाटणकर, डॉ. भारत पाटणकर,हर्षद कदम, नरेश देसाई, शंकरराव गोडसे, सुरेश जाधव, सुरेश पाटील, अजित पाटील चिखलीकर, पाटणच्या नगराध्यक्षा मंगल कांबळे आदी उपस्थित होते. आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘अच्छे दिन, १५ लाखांचे आमिष, युवकांना नोक-या, शेतकरी उज्ज्वल योजना याची पूर्तता या सरकारला करता आलेली नाही. पुन्हा हे निवडून आले, तर ही निवडणूक शेवटची असेल.’’

पिता- पुत्राच्या अनुपस्थितीची चर्चा
महाविकास आघाडीच्या मेळाव्याला विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील व त्यांचे पुत्र सारंग पाटील यांची अनुपस्थिती होती. दोघांचीही अनुपस्थितीची कार्यकर्त्यांत चर्चा होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR