24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeपरभणीपेठपिंपळगावात क्षुल्लक वादातून खून

पेठपिंपळगावात क्षुल्लक वादातून खून

पालम : पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव येथे क्षुल्लक कारणातून शिवाजी आत्माराम ढेंगरे( ४५) यांना मारहाण करण्यात आली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या रूस्तुम गोविंदराव शिंदे यांना देखील जबर मारहाण करण्यात आली. यावेळी एका आरोपीने डोक्यात दगड घातल्याने रूस्तुम शिंदे यांचा मृत्यू झाल्याची घटना दि. १७ जुलै रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिवाजी ढेंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पालम पोलिस ठाण्यात ८ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणातील एकाही आरोपीस अटक नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पेठपिंपळगाव येथील रहिवासी असलेले शिवाजी ढेंबरे यांचे बुधवारी रात्री क्षुल्लक कारणातून आरोपी सुनिल कांबळे यांच्या सोबत भांडण झाले. यावेळी आरोपी कांबळे यांनी ढेंबरे यांच्या सोबत वाद घालून डोक्यात बॅटरी मारून जखमी केले. यावेळी भांडण सोडविण्यासाठी रूस्तुम शिंदे आले असता त्यांना आरोपी सुदाम कांबळे, विजय कांबळे, बाबासाहेब कांबळे यांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. तर अनिता कांबळे, सलोनी कांबळे, चांगोबाई कांबळे यांनी शिंदे यांच्या अंगावर व डोळ्यात लाल मिरची फेकली. यावेळी आरोपी सचिन सुदाम कांबळे याने घरावर चढून घराच्या पत्रावरील चिरेबंदी दगड शिंदे यांच्या डोक्यात मारला. या घटनेत शिंदे यांचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद शिवाजी ढेंबरे यांनी दिली आहे.

या प्रकरणी पोउपनि गणेश सवंडकर यांनी पालम पोलिस ठाण्यात वरील सर्व आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन वरीष्ठांचे आदेशाने पुढील तपास मा.स.पो.नि.मुंडे यांच्याकडे दिला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपीना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR