22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयरेल्वेतील अंडा बिर्याणीमधून विषबाधा, ९० जण रुग्णालयात

रेल्वेतील अंडा बिर्याणीमधून विषबाधा, ९० जण रुग्णालयात

गोरखपूर : सुट्यांच्या कालावधीत अनेकजण लांबपल्लाच्या प्रवासासाठी रेल्वेला पसंती देतात. तसेच रेल्वेत अनेकप्रकारची सोय सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणे सोयीस्कर वाटते. मात्र याच लांबपल्ल्याच्या प्रवासादरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रेल्वेच्या जनआहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून जवळपास ९० प्रवाशांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रवाशांना इटारसी, कानपूर, झाशी अशा जवळपास सर्वच ठिकाणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंतपूर एक्स्प्रेस ही शुक्रवारी सकाळी गोरखपूरकडे जात असताना बल्लारशाह रेल्वे स्थानकावरुन जन आहार स्टॉलमधून अंडा बिर्याणीचे २०० पार्सल मागविण्यात आले. नागपूर रेल्वे स्थानकावरच्या स्टॉल वर त्यातील काही पार्सल उतरविण्यात आले होते. मागणीनुसार बल्लारशाह, नागपूर, इटारसी आणि पुढे वेगवेगळ्या प्रवाशांना अंडा बिर्याणी देण्यात आली. प्रवाशांनी ही अंडा बिर्याणी खाल्ल्यांनंतर तीन ते चार तासांनी गाडी इटारसीजवळ असताना प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागले. तसेच मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. अनेक डब्यांतील प्रवाशांमध्ये अशीच लक्षणे दिसून आल्याचे कळताच खळबळ उडाली.

रेल्वे प्रशासनाने ही माहिती कळताच कानपूर रेल्वे स्थानकावरील डॉक्टरांचे पथक ट्रेनमध्ये चढले आणि प्रवाशांवर उपचार सुरू झाले. काही प्रवाशांमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर लक्षणे दिसू लागली आणि त्यांना विविध रेल्वे स्थानकांवर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अंडा बिर्याणी खाल्ल्यानंतर प्रवाशांना विषबाधा होत असल्याचे निदर्शनास आल्याने मध्य रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिका-यांशी संबंधित अधिका-यांनी संपर्क साधला.

दरम्यान नागपूरच्या अधिका-यांना ही माहिती मिळताच त्यांनी अंडा बिर्याणीचे पार्सल कुठून आले आणि प्रवाशांना कुठून देणे सुरु झाले त्याची चौकशी सुरु केली. त्यानंतर १०० ते २०-० अंडा बिर्याणी पार्सला पुरवठा बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरुव झाल्याचे आणि नागपूर रेल्वे स्टेशनवरुन जनआहार स्टॉलवरून रेल्वे ट्रेनमध्ये अनेक पाकिटे भरण्यात आली होती. त्यामुळे मध्य रेल्वेचे विभागीय प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित पार्सल विकणा-या येथील जन आहारचा स्टॉल सिल करत नागपूर व बल्लारशाह केंद्रांवर विविध खाद्यपदार्थांचे नमुने जप्त केले. ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल मंगळवारपर्यंत प्राप्त होईल. त्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरवले जाईल, अशी माहिती अधिका-यांकडून देण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR