15.2 C
Latur
Wednesday, January 7, 2026
Homeमहाराष्ट्रउमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून निवडणूक अधिका-यांचा दबाव

उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून निवडणूक अधिका-यांचा दबाव

संजय राऊत यांचा आरोप

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांसाठी विविध पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा, माघार घ्यावी म्हणून निवडणूक अधिकारी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमक्या देत आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांच्यावर प्रत्येक ठिकाणी संबंधित पालकमंत्र्यांचा दबाव आहे, हे किती काळ चालणार ? ही लोकशाही आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काल उपमुख्यमंत्री (शिंदे) यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सरकारी अधिका-यांच्या गाड्यांचा ताफा उभा होता, त्यामध्ये काही आर.ओ. होते. आचारसंहिता लागू आहे ना, मग अधिका-यांनी आचारसंहितेचे पालन स्वत: केलं नाही तर ते उमेदवारांना आणि जनतेला कोणत्या आधारावर सांगतात की आचारसंहितेचे पालन करा? असा थेट सवाल राऊत यांनी विचारला.

निवडणूक आयोगाने या सर्व आर. ओंच्या फोनचे रेकॉर्ड तपासले पाहिजेत. त्यांना कोणत्या मंर्त्याचे, उपमुख्यमंर्त्यांचे कधी फोन आले आणि त्यानुसार कोणते उमेदवारी अर्ज हे बाद केले हे तपासले पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली.

गगराणीही कारस्थानात सामील आहेत का?
विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमक्या दिल्या आहेत. राहुल नार्वेकर यांचा विषय हा अत्यंत गंभीर आहे. ते काय मला उत्तर देणार, त्यांचा प्रवास शिवसेनेतूनच सुरू झाला आहे. ३० डिसेंबरचे दुपारी ४ नंतरचे सीसीटीव्ही फुटेज काढा. माझ्या माहितीप्रमाणे ते फुटेज गायब आहे. विधानसभा अध्यक्षांचे सीसीटीव्ही फुटेज गायब कसे होते? असा सवाल राऊत यांनी उपस्थित करत खळबळजनक आरोप केले आहेत. भूषण गगराणी हे पालिकेचे आयुक्त आहेत, तेही या कट-कारस्थानात सामील झाले आहेत का? असा खडा सवालही राऊत यांनी विचारला. सीसीटीव्ही फुटेज गायब होत आहे, ही कसली यांची यंत्रणा, महापालिका आयुक्तांनी याचे उत्तर दिले पाहिजे. त्या विभागाचे आर.ओ. आहेत त्यांची चौकशी व्हायला हवी या मागणीचा राऊतांनी पुनरुच्चार केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR