22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रतुमचा अहंकार बाजूला ठेवा

तुमचा अहंकार बाजूला ठेवा

आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई – शिवसेना आमदार आदित्य ठाकरे मुख्यमंत्री शिंदे आणि राज्य सरकारविरुद्ध कायमच आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वी आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यात जाऊन त्यांना चॅलेंज केले होते. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि माझ्याविरुद्ध ठाण्यात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानच दिले होते. आता, पुन्हा एकदा आदित्य यांनी मुंबईतील एका उड्डाणपुलावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. बेकायदेशीर मुख्यमंत्री म्हणत शिंदेंवर निशाणा साधला. तसेच, स्वत:चा अहंकार बाजूला ठेवून उड्डाणपूल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही वरळीतील एका पुलावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच, पूल बांधून पूर्ण असतानाही प्रवाशांसाठी खुला करण्यात न आल्याने संताप व्यक्त करत स्वत:च तो पूल सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, काही दिवसांतच हा पूल सर्वांसाठी सुरू करण्यात आला आहे. आता, मुंबईतील विमानतळाकडे जाणारा उड्डाणपूल बांधून तयार आहे, पण त्याचे लोकार्पण होत नाही. एकीकडे वाहतूक कोंडीची समस्या असतानाही केवळ अहंकारासाठी हा पूल मुख्यमंत्र्यांनी सुरू केला नसल्याचे आदित्य यांनी म्हटले आहे.

हा डोमेस्टिक एअरपोर्ट जंक्शनवरील उड्डाणपूल आहे, जो आठवडाभरापासून पूर्णपणे तयार आहे. पण, बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांना लोकांसाठी वेळ नसल्यामुळे त्याचे उद्घाटन झाले नाही. येथील पुलावर दररोज रात्री खांबावरील लाईट सुरू असतात, तर दुसरीकडे मुंबईकर तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. या मूलभूत गोष्टींसाठी मुंबईकर आपली बाजू मांडत आहेत. मात्र, निर्लज्ज राज्यकर्ते मुंबईकरांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करत आहेत, हे अत्यंत संतापजनक आहे, असे ट्वीट आदित्य यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR