नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर बीड जिल्ह्यातील पोलिसांचे एक एक कारनामे समोर आले. त्यात बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासले यांच्या वक्तव्यांनी पोलिस खात्याची लक्तरे वेशीवर टांगली. बीड कारागृहात असताना त्यांनी वाल्मिक कराडला चिकण, मटण आणि सर्व सोयीसुविधा देण्यात येत असल्याचा दावा केला. यावरून अटक झाली होती. मात्र, बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा सोशल मीडियावरून अनेक गौप्यस्फोट केले. हेच त्यांना भोवले असून, त्यांनी दिल्लीत अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
लोकप्रतिनिधींची बदनामी करणे आणि जातींमध्ये द्वेष निर्माण केल्या प्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली. रणजीत कासलेला दिल्ली येथे अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सोशल मीडियावर सातत्याने लोकप्रतिनिधी आणि यंत्रणेला लक्ष्य केल्याने सध्या रणजित कासले चर्चेत आहे.
कासले हा निलंबित आणि बडतर्फ होण्यापूर्वी बीड पोलिस दलाच्या सायबर गुन्हे शाखेत पोलिस उप अधिक्षक होता. वाल्मीक कराड याचा एनकाऊंटर करण्यासाठी आपल्याला प्रस्ताव देण्यात आल्याचा दावा करून त्याने त्यावेळी खळबळ उडविली होती. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो सतत काही ना काही खळबजनक दावे करत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. मात्र, अखेर त्याला अटक करण्यात आली.
दोन दिवसांची पोलिस कोठडी
रणजीत कासलेला मुंबई गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले, त्यावेळी त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सोशल मीडियावर सातत्याने लोकप्रतिनिधी आणि यंत्रणेला लक्ष्य केल्यामुळे सध्या चर्चेत रणजीत कासले सध्या चर्चेत आला आहे.